picture picture
November 30, 2011 Kavita / Poems 3 Comments

मला वाटतं…

मला वाटतं,
आयुष्य अगदी खासगी नोंदवहीसारखं असत.
जगात पहिल्यांदा डोळे उघडताना
वहीच पहिलं पान उघडतं
अगदी नवं कोर पान
त्यावर काळ्या शाईने अक्षर उमटतात
जशी मनःपटलावर ती कोरली जातात
वेळोवेळी नव्याने पानं उघडतं जातात
तशी नवी नवी अक्षर त्यावर उमटत जातात
आयुष्य सरत असतं…
काही पानं दुमडली जातात, परत कधीही न उघडण्यासाठी
तर काही पानांचे कोपरे दुमडले जातात, पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी
काही पानांत मोरपीस दडलेली असतात
तर काहींत जाळीदार सुकी पानं लपलेली असतात
काहीना सुवाच्य अक्षराची देणगी असते
तर काहींत अस्वस्थ मनाची कहाणी असते
पण काही पानं कोरीच राहतात
मुक्या आसवांचे त्यावर डाग असतात
आयुष्य सरत जात…
आणि पाहता पाहता शेवटच पान देखील मिटत
मिटलेल्या त्या पहिल्या आणि शेवटच्या पानात
सार रहस्य दडलेलं असतं
आयुष्य सरताच ते त्यात बंद होत
पुन्हा कधीही न उघडण्यासाठी
प्रत्येक आयुष्याच्या नोंदवहीत काहीतरी दडलेलं असतं

Tags: ,

3 Responses to “मला वाटतं…”

3 Comments

  1. Dhanashree says:

    it’s very true
    kharch kahi pan hi parat parat ughadli jatat punha punha jaganyasathi
    pan kahi pane kadhich ughadliv jat nahit karan tyani manache darwaje band kelele astat sarvan sathi

Leave a Reply

Name

Mail (will not be published)

Website