आपण उगाचच मोठे झालो…
कधी अस वाटतं कि
आपण उगाचच मोठे झालो !
रम्य ते बालपण सोडून
उगाच तारुण्याच्या कवेत आलो !!
… तूटलेले मन आणि
अपुर्ण स्वप्न यापेक्षा,
तूटलेली खेळनी आणि
अपुर्ण गृहपाठच बरा होता !!
BOSSचा ओरडा आणि
WORK LOAD यापेक्षा,
बाईँच्या छड्या आणि
क्षणभंगुर रागच बरा होता !!
PROJECT FILE आणि
PRESENTATIONचा धाक यापेक्षा,
चिञकलेची वही आणि
भाषनाची स्पर्धाच बरी होती !!
प्रेस केलेला FORMAL आणि
SUITABLE TIE यापेक्षा,
चुरगळलेला गणवेश आणि
सुटलेली बूठाची लेसच बरी होती !!
OFFICEची भरगच्च BAG
आणि LAPTOP यापेक्षा,
अर्धवट भरलेली WATERBAG आणि
शाळेच दप्तरच बर होतं !!
रजेच APPLICATION आणि
LIVEसाठीचा FORM यापेक्षा,
शाळेला मारलेली दांडी आणि
आजारपणाच नाटकच बर होतं !!
CAFETERIAमधल जेवन
आणि थंडगार COLDRINK यापेक्षा,
डब्याच रींगन आणि
बर्फाचा गोळाच बरा होता !!
घड्याळाचे वेध आणि
कामावरुन वेळ यापेक्षा,
वंन्दे मातरमचे बोल आणि
शाळेचा घंटानादच बरा होता !!
खरचं ! आता अस वाटत कि
आपण उगाचच मोठे झालो !
रम्य ते बालपण सोडून
उगाच तारुण्याच्या कवेत आलो !!
Tags: kavita, marathi





It’s very good
Thanks Prachi for your comments
It’s very good & its fact.
khup chan kavita aahe..so beautiful..